● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Sunday 30 September 2018

महात्मा गांधी


भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या महात्माजींची जन्म दोन ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. 

१८८८ मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरीस्टर ही पदवी मिळवली. १८९१ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरवात केली. पण आयुष्यात एक वळण अचानक असे आले की ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथे जाऊन वकिली करू लागले. तेथेही ते योगायोगानेच तेथील भारतीयांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले. पुढे या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. सत्याग्रहाचा प्रयोगही त्यांनी तेथेच केला. तेथेच त्यांनी १९०३ मध्ये इंडियन ओपीनिय नावाचे वृत्तपत्र काढले. सत्याग्रह शिबिराची स्थापनाही त्यांनी तेथे केली. १९१४ मध्ये ते भारतात परतले. 

१९१५ पासून ते महात्मा म्हणून विख्यात झाले. १९१७ मध्ये त्यांनी चंपारण येथील शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. पुढे १९२०-२२ मध्ये अहिंसक असहकार आंदोलन, १९३०-३२ दरम्यान दांडी येथील मीठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग, १९४०-४२ दरम्यान व्यक्तिगत सत्याग्रह आणि १९४२ चे भारत छोडो आंदोलन या सार्‍यात महात्माजींचे नेतृत्व झळाळून उठले. 

९ ऑगस्ट १९४२ ला त्यांनी मुंबईत करा किंवा मरा असे आवाहन जनतेला केले. त्यानंतर त्यांना अटक झाली. त्यांना पुण्यात आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आले. तेथे सहा मे १९४४ ला त्यांना सोडणअयात आले. त्यांनी अनेकदा उपोषणाचा मार्ग अवलंबून ब्रिटिश सरकारला जेरीला आणले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर पंधरा ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. पण त्यावेळी हा महात्मा नोआखालीत सुरू असेलली जातीय दंगल विझवण्यासाठी काम करीत होता. लोकांसाठी आयुष्याचा होम करणार्‍या महात्मा गांधींना एका असंतुष्टाने तीस जानेवारी १९४८ मध्ये गोळी घातली. त्यातच त्यांचे निधन झाले. 

महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे. 

इंडियन ओपिनियन मध्ये गांधीजींनी लिहिले आहे... व्यक्तीचा प्रमुख संघर्ष आतून असतो. ती आतील शक्ती प्रेरणा देत असते. हे कार्य वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे करू शकतात. एका पत्रकाराच्या रूपाने त्यांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार मांडले, त्यामुळे तत्कालीन बुद्धिमंत वर्गाने म्हणजे वकील, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, ट्रेड युनियनचे नेते आदींनी गांधीजींना आपले प्रेरणास्थान मानले. 

त्यांनी सुरू केलेल्या 'हरीजन' वृत्तपत्राचा उद्देशच ग्रामीण भागातील लोकांचे भले करणे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा करणे होता. सामाजिक सुधारणा, शिक्षणपर लेखांच्या शिवाय गांधीजींच्या वर्तमानपत्रात आगामी राजकीय कार्यक्रम, रणनीती यांचेही विवरण असायचे. 




महात्मा गांधी

        मोहनदास करमचंद गांधी  भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते

        असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधीजी आजीवन साम्प्रदायीकातावादा (सम्प्रदायांवर राजकारण करणे) चे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणार्‍या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले.१९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.

गांधी आणि आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गांधीजींची अस्पृश्योद्धाराची भुमिका नेहमीच दांभिक वाटत होती. स्वत: गांधीजींची अस्प्रूश्योद्धाराची तळमळ प्रामाणिक होती, असे मी मानतो. गांधीजी स्वत: वैयक्तिक अस्पृश्यता पाळत नसत, अस्पृश्यता न पाळणारे व अस्पृश्योद्धाराचे काम करणारे शेकडो स्पृश्य कार्यकर्ते गांधीजींच्या चळवळीमुळे निर्माण झाले, हे उघड सत्य आहे
गांधीजींची खरी अडचण वेगळी होती. गांधीजी हे नुसते हिंदू धर्माचे अभिमानी नव्हते तर वर्णाश्रमाचे पुरस्कर्तेही होते! पण त्यांच्या धर्मकल्पनेत रुढी आणि चालीरितींना जागा नव्हती. ते परंपरागत जीवनाचे अभिमानी होते, पण त्यांना स्त्रीशिक्षण आवश्यक वाटे. प्रौढविवाह, प्रेमविवाह, हिंदू धर्मातल्या धर्मात आंतरजातीय विवाह या सा-यांनाच गांधीजींचा सक्रीय पाठींबा होता. अस्पृश्यांविषयीची त्यांची तळमळ प्रामाणिक होती, तो त्यांचा नित्य कार्यक्रम होता. अस्पृश्यांचा प्रश्न गांधीजी हिंदू समाजांतर्गत प्रश्न म्हणून सोडवु इच्छित होते. ज्यामुळे हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा यांच्याविषयी अस्पृश्य समाजाच्या मनात तिरस्कार व तिटकारा निर्माण होईल असे काही करण्यास गांधीजी तयार नव्हते. परंपरावादी हिंदूंचे परंपरावादी मन न दुखावता परंपरेच्या भाषेत बोलुन गांधीजी परंपरेच्या चालीरिती बदलु इच्छित होते. ह्यातील तथ्य इतकेच की, गांधी प्रामुख्याने सुधारणावादी होते.
गांधीजींचा कार्यक्रम अस्पृश्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारा, अस्पृश्यांमध्ये काही सुधारणा घडवुन आणणारा सुद्धा असेल .. मात्र हा कार्यक्रम दलितांमध्ये नवा आत्मविश्वास, जिद्द आणि जागृती निर्माण करणारा, त्यांची अस्मिता पेटवणारा कार्यक्रम असु शकत नव्हता. गांधीजी अस्पृश्यतेवर बोलत तरी होते, नेहरु-पटेल यांच्यासारख्या कॉंग्रेसी सवर्ण नेत्यांना अस्प्रुश्यांचा प्रश्न नित्य चर्चेचा कधी वाटलाच नाही. सगळीकडेच मुलभुत सामाजिक परिवर्तन घडवायचे आहे, न्याय व समतेवर आधारलेले नवे जीवन उभारायचे आहे.. त्यात अस्पृश्यतेसारखे प्रश्न आपोआपच संपून जातील असंच या नेत्यांना वाटत आलं. गांधीजींच्या प्रामाणिक अनुयायांची अशी संख्या किती होती ? फार थोडी ! उरलेली सगळी कॉंग्रेस ही वरिष्ठवर्णीय, सामाजिक दृष्ट्या सनातनी आणि आर्थिक दृष्ट्या स्थितीवादी अशीच होती.

महात्मा गांधी

 राष्ट्रपिता महात्मा गांधी



ब्रिटीशांनी भारतावर दोनशे वर्षे राज्य केले, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानीनी आपल्या घराचा त्याग केला, प्राणाची आहुती दिली. अशाच महान स्वातंत्र्य सेनानी पैकी एक म्हणजे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी.

महात्मा गांधी एक महान स्वतंत्र सैनिक होते, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च केले. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदरमधील हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदर राज्यात दिवाण म्हणून काम करत असत. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते. त्यांना वाचनाची आवड होती, त्यांना गोष्टी वाचायला आवडत असे आणि त्या गोष्टी त्यांच्या मनावर खोलवर परिणाम ही करत असत. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजकोट मध्ये पूर्ण झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी महात्मा गांधींचे लग्न तेरा वर्षीय कस्तुरबा कपाडिया यांच्याशी झाले, नंतर त्यांना कस्तुरबा गांधी म्हणून ओळखू जाऊ लागले. महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधींनीही त्यांना विविध चळवळीमध्ये साथ दिली, गांधीजी जेलमध्ये असताना त्यांनी चळवळींचे अध्यक्षपद सुद्धा सांभाळले. त्यांनी महात्मा गांधीजींना शेवटपर्यंत साथ दिली, पुढे जाऊन पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

१८८८ मध्ये महात्मा गांधी समलदास विद्यालयात दाखल झाले पण ते महाविद्यालय सोडून पोरबंदर ला परत आले. एका कौटुंबिक मित्राच्या सल्ल्यावरून ते कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले आणि १८९१ मध्ये ते भारतात परत आले. ते लंडनमध्ये असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला पण त्याची बातमी त्यांना कुणीही कळवली नाही जेणेकरून त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे. बॅरिस्टर बनून भारतात परत आल्यानंतर त्यांनी बॉम्बेमध्ये (मुंबई) वकिलीची सुरुवात केली. पण त्यामध्ये ते तेवढेसे यशस्वी झाले नाहीत म्हणून ते पोरबंदरला परतले. त्यावेळी त्यांना दक्षिण आफ्रिकेतून नोकरीची संधी मिळाली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेमध्ये तेव्हा नाटाल ब्रिटिश सरकार होते. तिथे भारतीय वंशाच्या लोकांना वर्णभेदाचा त्रास होत असे. या सर्व अनुभवातून महात्मा गांधींनी याबद्दल विरुद्ध लढा देण्याचे ठरवले. इथूनच महात्मा गांधींचा खरा प्रवास सुरू झाला. महात्मा ही पदवी त्यांना दक्षिण आफ्रिकेतच मिळाली.
गोपाळ कृष्णा गोखले यांच्या विनंतीला मान देऊन ते भारतात परत आले. १९१५ साली दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर त्यांनी स्थानिक शेतकरी आणि कामगार यांच्या उच्च कर आणि भेदभावाच्या विरोधात लढा देण्यास सुरुवात केली. पुढे १९२१ मध्ये ते राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सहभागी झाले आणि तिथून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत आपले योगदान देण्यास सुरुवात केली. १९३० मध्ये काँग्रेसने स्वतंत्र भारताची घोषणा केली, पण ती ब्रिटिश राजने मान्य केली नाही पण काही वाटाघाटी करण्यात आल्या, ज्यानुसार भारतीयांना प्रांतीय सरकार मध्ये भाग घेण्यास परवानगी मिळाली. यादरम्यान महात्मा गांधीजींनी अनेक चळवळी, सत्याग्रह, आंदोलने केली. १९१७ मध्ये बिहारच्या चंपारण सत्याग्रहात त्यांना यश मिळाले. १९१८ मध्ये गांधीजींनी उच्च महसूलाविरुद्ध खेडामध्ये असहकार सत्याग्रह पुकारला. वल्लभभाई पटेल यांनी शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व केले आणि ब्रिटिशांसोबत वाटाघाटी करून राजस्व संकलन निलंबित केले व सर्व कैद्यांना सोडवले. १९१९ मध्ये गांधीजींनी असहकार आंदोलन पुकारले. या दरम्यान जमलेल्या लोकांनी सर्वानजीक मालमतेची नासाडी केली. याच दरम्यान जालियनवाला बाग हत्याकांड झाले. लोकांकडून होणारी हिंसा थांबवण्यासाठी गांधीजी अमरण उपोषणाला बसले. त्यानंतर त्यांनी आपले लक्ष स्वदेशी मोहिमेकडे वळवले. ज्या नुसार त्यांनी परदेशी वस्तूवर बहिष्कार घातला, स्वदेशी खादीची वस्त्र वापरण्याचे आवाहन केले. या सोबत त्यांनी जनतेस ब्रिटिश सरकारच्या नोकऱ्या, पदव्यांचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले. पुढे जाऊन हे असहकार आंदोलन वाढले, ब्रिटीशानी गांधीजींना ६ वर्षांची सजा सुनावली. या दरम्यान काँग्रेस मध्ये फूट पडू लागली. १९२४ मध्ये, २ वर्षानंतर गांधीजींना अॅपेन्डिसाइटिसच्या शश्त्रक्रियेसाठी सोडण्यात आले. पुढे त्यांनी आपला लढा चालू ठेवला. इंग्रजांशी लढा देताना महात्मा गांधींनी अहिंसा, असहकार आणि सत्याग्रहाचा वापर केला. बऱ्याच वेळा त्यांना अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले, परंतु ते निराश न होता ब्रिटिशांविरुद्ध लढा चालू ठेवला. पुढे जाऊन त्यांनी विदेशी वस्तू त्यागल्या, ते फक्त खादीचे धोतर आणि शाल परिधान करत असत. १९३० मध्ये त्यांनी दांडी यात्रे द्वारा त्यांनी मिठावरच्या कराविरुद्ध सत्याग्रह पुकारले. १२ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान गांधीजी हजारो जनसमुदयासहअहमदाबाद ते दांडी अशी ३८८ किलोमीटरची पायी यात्रा केली. ब्रिटिशांनी या दरम्यान ६०,००० लोकांना जेल मध्ये टाकले. १९४२ मध्ये गांधीजींनी “भारत छोडो” अभियान सुरु केले. याच दरम्यान त्यांनी “करो या मरो” चा नारा दिला. ब्रिटीशानी त्यांना पुण्यातील आगा खान पॅलेस मध्ये नजरकैदेत ठेवले. या दरम्यान त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधींचे निधन झाले, आणि गांधीजींनाही मलेरिया झाला होता. गांधीजींना ६ मे १९४४ ला सोडण्यात आले. तेव्हा काँग्रेसचे राजनैतिक वातावरण बदलले होते, मुहम्मद अली जिन्नाह स्वतंत्र मुस्लिम देशाची मागणी करू लागले. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग केला. त्यांनी जनतेच्या एकोप्याची शक्ती जाणली होती म्हणून त्यांनी विविध जाती, धर्म, समाज, वर्ण, वय किंवा लिंग सर्व मतभेद विसरून भारतीयांना स्वातंत्र्यासाठी एकत्र आणले. अखेरीस १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज भारत सोडून निघून गेले पण भारत आणि पाकिस्तान असे विभाजन करून. पण त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य पाहण्यासाठी ते खूप वर्ष जगू शकले नाहीत. ३० जानेवारी १९४८ ला नथुराम गोडसे नावाच्या युवकांनी त्यांची दिल्लीतील बिर्ला मंदिर येथे हत्या केली. महात्मा गांधी हे एक महान व्यक्तिमत्त्व होते त्यांनी आपले पूर्ण आयुष्य मातृभूमीसाठी अर्पण केले. त्यांनी दाखवून दिले की अहिंसा आणि सत्याग्रह या मार्गानेही देशाला स्वतंत्र मिळवून देता येते. त्यांची शिकवण आणि आयुष्य जगातील अनेक नेत्यांना प्रेरणादायी ठरले. महात्मा गांधी आपल्या शिकवणी आणि मार्गदर्शनाच्या रूपाने प्रत्येक भारतीयांच्या हृदयात आहेत. आपण त्यांचे बलिदान केव्हाच विसरू शकत नाही.

SOURCE : TEEN AT HEART

Tuesday 18 September 2018

राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना

●राजीव गांधी अपघात योजना●
१       
कार्यक्रमाचे / योजनेचे नाव
राजीव गांधी अपघात योजना
लाभधारकासाठी पात्रतेच्या अटी
अपघात, वाहनाचे नुकसान, शैक्षणिक, साहित्य नुकसान
लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी
अपघात पंचनामा, वैद्यकीय उपचाराची बिले.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती
अपघात झाल्यानंतर दिवसाच्या आत क्लेम फॉर्म आणणे.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे
या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल ( अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर ती ही तपशिल द्यावा )
·        विना शस्त्रक्रिया – २०००/- * अपंगत्व – २००००/- ते ५००००/- पर्यंत * शस्त्रक्रिया –रु.१००००/- पर्यंत * अपघाती मृत्यु – ३००००/-
अनुदान वाटपाची पद्धत
बिल सादर केल्यानंतर चेकने रक्कम मिळते.
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ?
शाळेमार्फत अर्ज तयार करून ग.शि.अ. यांचे शिफारशीने विमा कंपनीकडे सादर करणे
अर्जाबरोबर भरावयाची फी ( असल्यास )
नाही.
१०
अन्य फी ( असल्यास )
नाही.
११
अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान माहिती भरली पाहिजे, हे ही स्पष्ट करावे.
नमुना अर्जावरच अर्जदाराने माहीती भरली पाहिजे.
१२
सोबत जोडावयाचीपरीशिष्टे ( शिफारस पत्र / दाखल / दस्तऐवज )
नमुना अर्ज वैद्यकीय बिले.
१३
त्या परीशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना
क्लेम फॉर्म
१४
कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदनाम
मा. शिक्षणाधिकारीसा (प्राथ) जि.प.कोल्हापूर
१५
उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम, जिल्हा पातळीवर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे )
उपलब्ध रक्कम अपघात धारकाला मिळते.
१६
लाभधारकांची प्रत्येक वर्षागणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी
कार्यालयात उपलब्ध असते.
१७
उद्दीष्ट ( ठरविले असल्यास )










Friday 14 September 2018

मराठवाडा मुक्तीसंग्राम 3


मुक्ती संग्राम आणि पार्श्वभूमी –
पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात होता.
हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान  निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.
हैदराबाद संस्थानची त्यावेळी तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.

मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.
मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर,  हरिश्चंद्गजी जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच सूर्यभान पवार आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला.
या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा नं बाळगता काम केले.
या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.
निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाली – ती सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामूळे. ते भारताचे तत्कालीन गृहमंत्री होते. खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळ॓ जनतेस न्याय मिळाला.
मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद  काबिज केले.
15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.
हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला.

हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला…!
हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला…!
हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला…!

1 मे 1960 पासून मराठवाडा हा नवीन प्रशासकिय विभाग म्हणून ओळखला जाऊ लागला.



मराठवाडा मुक्तीसंग्राम 2


देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतू त्यानंतरही मराठवाडा हैद्राबाद येथील निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होते. देशात त्यावेळी अस्तित्वात असलेली संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली होती. मात्र हैद्राबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. स्वातंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.

हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहाद्दूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह याचे राज्य होते. निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबला तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. तेव्हा मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यात आला होता.

हैद्राबाद संस्थानामध्ये मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग सामील होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.

आपल्या जीवाची पर्वा न करता मराठवाड्याच्या गावागावातून हा संग्राम लढण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जरुळ गावातील भाऊराव भिमाजी मतसागर यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे तसेच सर्व कुटुंबाचे योगदान व उचललेले कष्ट विशेष उल्लेखनिय होय. बदनापूर तालुक्यातील धोपटश्वर येथील दगडाबाई शेळके, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्रजी जाधव, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातनेश्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर, मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी, तर हिंगोली जिल्ह्यातील चंद्रकांत पाटील गोरेगावकर, दीपाजी पाटील दातीकर, बर्हिजी शिंदे वापटीकर, बापुराव शिंदे वापटीकर, भीमराव उर्फ बाबासाहेब शेषराव नायक सवनेकर, वासुदेवराव बसोले, बाबुलाल माणिकचंद राठौर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या संग्रामाच मोल काढणं शक्य नाही.

भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी निजाम तयार होत नव्हता. त्याने नागरिकांवर अतोनात अत्याचार सुरु केल्याने पोलीस ॲक्शन सुरु झाले. भारतीय फौजांनी हैद्राबाद संस्थांनावर चारी बाजूंनी हल्ले सुरु केल्याने निजामास सैन्य माघार घेण्यास भाग पाडले. हैद्राबादचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस यांनी 17 सप्टेंबर, 1948 रोजी शरणांगती स्वीकारल्याने खुद्द निजाम शरण आला. मराठवाडा मुक्तीसंग्रामचे हे आंदोलन सतत 13 महिने लढले गेले. निजामाच्या हुकूमशाहीतून मराठवाडा मुक्त होऊन हैद्राबाद संस्थानावर भारतीय तिरंगा फडकला. 1 नोव्हेंबर 1956 पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला.

लेखक - अरुण सूर्यवंशी,
जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली.

मराठवाडा मुक्तीसंग्राम 1


भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, मात्र त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. 

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. 

हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या १ कोटी ६० लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते. 

मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला . 

या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही. 

निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर २ तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. १५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते. 

हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी १७ सप्टेंबर १९४८ रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला. 

Saturday 1 September 2018

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्

जन्म आणि बालपण
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्रप्रदेशातल्या तिरुत्तणी या अतिशय छोट्या खेड्यात झाला. या गावात ना कसल्या सोयी होत्या ना सुविधा. सारे विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक असलेल्या शाळेत राधाकृष्णन यांचं प्राथमिक शिक्षण पार पडलं. छोट्या राधाकृष्णन यांची कुशाग्र बुद्धीमत्ता त्यांच्या शिक्षकांनाही चक्रावून टाकणारी होती. ‘बुद्धीनं तल्लख असलेल्या या विद्यार्थ्याला कुठलीही गोष्ट चटकन समजते, त्यासाठी त्याला फारसे कष्ट घ्यावे लागत नाही. उलट कधी कधी तर तो असे प्रश्न विचारतो की त्यामुळे शिक्षकही कोड्यात पडतो’ असं शिक्षक नेहमी म्हणत असतं. डॉ. सर्वपल्ली यांच्या बुद्धीमत्तेला आणि कुशाग्रतेला लहानपणी मिळालेली ही पहिली पावती खूप महत्त्वाची ठरली. 

पोषाख
डॉ. राधाकृष्णन यांचा वेष शुभ्र आणि निर्मळ असायचा. ते अंगात लांब,बंद गळ्याचा शुभ्र जयपुरी कोट घालत. तसंच स्वच्छ पांढरं धोतर नेसत. याशिवाय तेनेहमी डोक्याला दक्षिणी पद्धतीचा फेटा बांधत. हा फेटा 22 हात लांब कापडाचा असे. यापोशाखामुळे त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि रुबाबदार वाटे, तसेच ते मोहक आणितेजस्वीही वाटत.

तत्वज्ञानातील गोडी
तत्वज्ञान हा इतरांसाठी कंटाळवाणा ठरणारा विषय डॉ. राधाकृष्णन यांच्या मात्र खूप आवडीचा विषय होता. त्यामुळे त्यांनी ‘बी.ए’ आणि ‘एम.ए’साठी याच विषयाची निवड केली होती. एकटे असतानाही राधाकृष्णन सतत कसला ना कसला विचार करत बसत. 
विचार करायचा जणू छंदच त्यांना जडला होता. सर्वसामान्य मुलांसारखं सरळधोपट मार्गानं जाणं आणि पैसे कमावणं अशा गोष्टींना त्यांच्या विचारात जागाच नव्हती. 
‘एम.ए’मध्ये आपल्या आवडत्या विषयात प्रथम वर्ग मिळवणाऱ्या अवघ्या २१ वर्षांच्या राधाकृष्णन यांना नोकरी शोधण्यासाठी फारसे कष्ट घ्यायची गरजच लागली नाही. मद्रास इथल्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयानं त्यांना ‘तत्वज्ञान’ हा विषय शिकवण्यासाठी पाचारण केलं. साहजिकच, राधाकृष्णनं यांनीही संधीचा फायदा घेतला. या महाविद्यालयातील वातावरणात रमले. १९०९ ते १९१६ अशी ऐन तारुण्याची आठ वर्षे त्यांनी याच महाविद्यालयात सेवा बजावली. 

भारतरत्न डॉ. राधाकृष्णन
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी बनारस हिंदू विद्यापीठाला एक वेगळीच उंची गाठून दिली. भरभराट केली. त्रिखंडात नाव मिळाले. (1948). शिक्षणक्षेत्रात त्यांनी जिथे जिथे पाय ठेवले, जे पद स्वीकारले त्याचे ़डॉ. सर्वपल्लींनी केवळ सोनेच केले. प्रसन्न, तेजस्वी, चित्ताकर्षक, मोहक, अभ्यासू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्याची सर्वांवर चांगलीच मोहिनी पडे. छाप पडे. त्यांच्या सहवासात येणाऱ्यांचे डोळे त्यांच्या सहवासाने. दीपत! त्यांच्या या गुणांचा नि कर्तृत्वाचा परिपाक म्हणूनच की काय, भारत सरकारने त्यांना `भारतरत्न` हा किताब देऊन गौरविले.

१२ मे १९६२ रोजी झाले राष्ट्रपती
भारताच्या इतिहासातातील हा सोन्याचा दिवस. तेजस्वी दिवस. या दिवसाची नोंद भारताच्या सुवर्णक्षरांनीच केला जाईल. या आधीचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद. एक तप राष्ट्रपतीपदाची धुरा वाहून ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले. 
त्यांच्या जागी भारताचे नवे राष्ट्रपती कोण होणार, हा प्रश्नच उरला नाही. कारण स्वत:च डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी डॉय सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे नाव या पदासाठी सुचविले. अन् हा वाद उभाच राहिला खेळावा लागला नाही. 
या निवडीमुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील आबालवृद्धांना, तत्वज्ञ मंडळींना मनस्वी आनंद झाला. `भारताच्या या सर्वोच्च पदावर आपला माणूस विराजमान झाला आहे`.
ही भावनाच त्यांना सुखावून गेली. जगाच्या कानाकोपाऱ्यातून अभिनंदनाच्या तारा आल्या. कौतुकाचा नुसता वर्षाव झाला. आपल्या शेजारचे राष्ट्र नेपाळ. तिथल्या नरेंशापासून थेट अमेरिका, इंग्लंड, रशिया, जपान, इ. नव्हे तर त्यांना सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासनही दिले. 
राष्ट्रपतीपदावर आरूढ होण्यापूर्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी एक थोर तत्वज्ञ म्हणून भारताभूमीची महनीय सेवा बजाविली होती. तिचे पांग फेडले होते. तिचे नाव उभ्या जगात रोशन केले होते. ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी पाऊल ठेवले, जे जे पद भूषविले तिथे तिथे त्यांनी आपल्या पावलांचा दमदार ठसा उमटविला. त्या त्या पदावर असामान्य अन् अपूर्व कामगिरी केली होती. अजोड कर्तृत्व करून दाखविले होते. देशाची पत नि इभ्रत वाढविली होती. म्हणून असावे, या थोर तत्वज्ञाकडे अन् प्राचीन इतिहास व परंपरा असलेल्या त्याच्या भारताकडे वेगळ्या नजरेने नि अपेक्षेने उभे जग पाहात होते ! आदराने नतमस्तक झाले होते. 
आंतरराष्ट्रीय नि जागतिक कामगिरी बजाविणाऱ्या युनेस्कोसारख्या संघटनेत मोलाची, महत्त्वाची अशी शैक्षणिक, सामाजिक नि सांस्कृतिक कामगिरी बजावून डॉ. राधाकृष्णन मायदेशी परतले अन् त्यांनी भारतात पाऊल ठेवताच भारत सरकारने त्यांचा जंगी सत्कार केला. थाटामाटात मोठा गौरव केला.

विदेशाची इच्छा
राधाकृष्णन यांना तरुण वयातच म्हैसूर विद्यापीठात तत्वज्ञान याविषयाचे विभागप्रमुख म्हणून नेमण्यात आलं. येथे त्यांनी हिंदू तत्वज्ञानाचा गाढा अभ्यासकरून आपला व्यासंग वाढवला.
हिंदू धर्म आणि तत्वज्ञान सगळ्या धर्मांहून कसं श्रेष्ठआहे, हे जगाला सप्रमाण दाखवलं. ते कधीही विदेशात शिकण्यासाठी गेले नव्हते. तेनेहमी म्हणत, “आपल्या देशात कुठल्याही ज्ञानाला कमी नसताना विदेशात शिकण्यासाठी का जाऊ? शिकण्यापेक्षा तेथील लोकांनाशिकवण्यासाठी जायला मला आवडेल.” पुढे ते ऑक्सफर्ड विद्यापीठाततत्वज्ञान विषय शिकवण्यास रवाना झाले.

परदेश वाऱ्या गाजल्या
म्हैसूरच्या विद्यापीठात तीन वर्षे प्राध्यापकी केल्यावर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् कोलकाता विद्यापीठात अध्यापनासाठी दाखल झाले. आशुतोष मुखर्जी यांनीच डॉक्टरसाहेबांना तशी गळ घातली होती. कोलकाता विद्यापीठातही `एक विद्यार्थीप्रिय अध्यापक` म्हणून त्यांचे नाव झाले. दबदबा वाढला.
कोलकात्याच्या याच मुक्कामात तिथल्या `पंचम् जॉर्ज व्याख्यानमाले `त व्याख्याने देण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले. हे आमंत्रण मानाचे समजले जाई. त्यांची या व्याख्यानमालेतील सर्व भाषणे रसिक श्रोत्यांच्या मनाची पकड घेऊन गेली. डॉक्टरसाहेबांची सर्वत्र गौरव झाला.
याच सुमारास म्हणजे १९२६ साली इंग्लंडमध्ये एक `आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषद` भरविण्यात आली होती. तिचे महनीय वक्ते म्हणून डॉ. सर्वपल्लींना मानाचे आमंत्रण आले अन् ते त्यासाठी लंडनला गेले.
या परिषदेला देशोदेशींचे नामवंक, विख्यात तत्वज्ञ आणि विचारवंत उपस्थित होते. मात्र, डॉ. राधाकृष्ण यांनी बाजी मारली. त्यांची या परिषदेतील भाषणे विद्वत्तापूर्ण, व्यासंगपूर्ण झाली. त्यांच्या भाषणांना मोठा समुदाय उपस्थित राहायचा. त्यांच्या वाणीमुळे आणि वकृत्वामुळे ते लोकांतमध्ये प्रिय होते.

धारधार लेखणी
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा सर्वात आवडता विषय होता तो लेखन. शालेय जीवनापासूनच त्यांनी हा लेखनाचा छंद जोपासला होता. आपली मते, विचार ते निर्भीडपणे मांडीत आणि लिहीत. आपल्या लेखनातून सतत ते सत्याचाच पाठपुरावा करीत. त्यांच्या लेखनाला एक वेगळीच धार होती. तेज होते. त्यांचे लेखन मोजकेच होते. पण विचार करायाला लावणारे होते.
तत्वज्ञान हा तर त्यांचा सर्वात आवडता विषय. या विषयावर त्यांनी अनेक कसदार लेख विविध नियतकालिकांतून लिहिले. निरनिराळ्या विषयांवरील त्यांच्या ग्रंथाना सखोल तत्वज्ञानाची जोड मिळाली होती. साहजिकच या ग्रंथानी आम दुनियेत वाहवा मिळविली. त्यांचे ग्रंथ म्हणजे भारत देशाचा अमोल ठेवाच आहे. ते एक मैल्यवान लेणे होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी मोजकेच ग्रंथ लिहिले. पण त्या ग्रंथांनी त्यांना प्रसिद्धीच्या उंच शिखरावर नेऊन ठेवले. या ग्रंथांची नावे जरी नजरेखालून घातली तरी त्यातील विषयांची विविधता उमगेल.

१. भारतीय तत्वज्ञान- भाग २
२. भारतीय तत्वज्ञान- भाग २
३. आजचा आवश्यक नवा धर्म
४. अर्वाचीन तत्वज्ञान धर्माचे स्थान
५. हिंदू तत्त्वज्ञान आणि जीवनविषयक तत्त्वे
६. तत्त्वज्ञानाची जीवनविषयक मते
७. पौर्वात्य धर्म व पाश्चात्य शास्त्रे
८. अर्वाचीन भारतीय तत्त्वज्ञान
९. महात्मा गांधी
१०. पौर्वात्य व पाश्चिमात्य धर्म
१२. भगवदगीता
१३. बुद्ध व त्याचे धम्मपद
१४. प्रमुख उपनिषदे व त्यांचे तत्त्वज्ञान
१५. जागतिक तत्त्वज्ञानाचा इतिहास

त्यांची ही पुस्तके भारतीय तत्त्वज्ञानाची, धर्माची आणि संस्कृतिची ओळख करून देतात. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान, धर्म व संस्कृती यांची ध्वजा दाही दिशांना सतत उंचच उंच फडकवित ठेवली. ही भारतीय साहित्याचे थोर सेवाच ठरली आहे.
भारताबाहेरील अनेक टीकाकार भारतीयांना प्राणापलीकडे प्रिय असणाऱ्या हिंदू धर्मावर, त्याच्या तत्त्वज्ञानावर, आचार-विचार, संस्कृतीवर, रीतिरिवाजावर सडकून टीका करायचे. या टीकेत जहालपण असायचे. विरोधक आणि टीकाकारांना आपल्या धार धार लेखणीने गप्प केले.

डॉ.राधाकृष्णन यांच्याबद्दल दिग्गजांची मते
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बाबतीत सर्वांच्याच मनामध्ये अपार श्रद्धा अन् आदर होता. थोर राजकारणी, तत्वज्ञ यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता. पण असे कशाला, या मंडळींना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी काय वाटते ते पाहू या...

● ‘स्वामी विवेकानंदानंतर भारतीय धर्माबद्दल सरस व्याख्याने करणारा हाच एकमेव थोर वक्ता पाहवयास मिळाला
-प्राचार्य जॅक्स
ऑक्सफर्ड महाविद्यालय, ऑक्सफर्ड


● ‘भारताची प्रतिष्ठा आणि संस्कृती जगात अजरामर करण्यासाठी झगडणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान योद्धे आहेत. पाश्चिमात्य राष्ट्रंनी विज्ञान आणि कार्यक्षमता जगाला दिली आहे, तर डॉ. राधाकृष्णन यांनी जगाला प्रेम अन् माधुर्य यांचा महान संदेश दिला आहे.’
-रामस्वामी अय्यर


● ‘सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारताबाहेर प्रथम आमच्याच व्याख्यानमालेत व्याख्याने देऊन, आमचाच खरा सन्मान केला आहे. गौरव केला आहे. 
-संपादक, हिल्बर्ट


● ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे नवभारताचे तत्वज्ञ आणि पाश्चात्यांना हिंदू धर्माची ओळख करून देणारे विवरणकार आहेत. 
-फ्रान्सिस
डॉन ऑफ इंडिया ग्रंथाचे लेखक


● ‘डॉ. राधाकृष्णन यांना पाश्चात्य नि पौर्वात्य तत्वज्ञानाचे सखोल ज्ञान आहे. पूर्व आणि पश्चिम यांचा हा सुरेख रंगमंच आहे.’
-प्राचार्य जॅक्स 
ऑक्सफर्ड महाविद्यालय


● ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे गौतम बुद्ध या विषयावर इतके सरस, प्रभावी आणि परिणामकारक भाषण झाले की, अमेरिकन समाजाल संभ्रम पडला की, हे गौतम बुद्ध आहेत की सर्वपल्ली राधाकृष्णन 
-एक अमेरिकन लेखक


● सर्वपल्ली राधाकृष्णनसारखा थोर, लायक, सुयोग्य तत्ववेत्यांचे कुशल मार्गदर्शन, नेतृत्त्व बनारस विश्वविद्यालयाला लाभले, तर कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. चिंतेचे कारण नाही.
-पंडित मदनमोहन मालवीय


● एक थोर तत्वज्ञ राजा, आभाळाएवढा माणूस
-डॉ. प्लेटो


● गेली बारा वर्ष स्वतंत्र भारताची अमोल सेवा त्यांच्या हातून घडली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनसारखी ज्ञानी, मुत्सद्दी आणि प्रेमळ व्यक्ती आज राष्ट्राध्यक्ष म्हणून आपणास लाभली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.
-पंडित जवाहरलाल नेहरू
भारताचे पहिले पंतप्रधान

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्

५ सप्टेंबर हा दिवस म्हणजे आपल्या स्वतंत्र भारताच्या एका महान शिक्षकाचा जन्म दिवस आहे. शिक्षणक्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ज्यांनी ठसा उमटवला आणि आदर्श शिक्षक म्हणून सरवानकडून सन्मान मिळविला ते महान शिक्षक म्हणजे  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होत. ५ सप्टेंबर १८८८ रोजी त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तीरुत्तानी या गावी झाला. त्यांनी उपराष्ट्रपती  आणि राष्ट्रपती असि दोन्ही पदे भूषविली. देशात आणि प्रदेशात त्यांनी अनेक सन्मान मिळविले. पण ते आदर्श शिक्षक म्हणून सर्वांना आदरणीय वाटत होते, त्यामुळे त्यांचा जन्म दिवस ‘शिक्षकदिन ‘म्हणून पाळला जात होता.

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे अत्यंत विश्वासू वृत्तीचे होते. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतांना त्यांनी सतत पहिली श्रेणी मिळवून आपल्या बुद्धीची चमक दाखविली. त्यांचा तत्वज्ञान हा विषय अत्यंत आवडीचा होता. हा विषय घेऊन त्यांनी  बी.ए.च्या परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाले. पुढे एम.ए.झाल्यावर प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम सुरु केले. १९२१ साली म्हैसूरला नवीन विद्यापीठ स्थापन झाले. तेथे राधाकृष्णन तत्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून गेले तेथून त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. १९२६ मध्ये इंग्लंडला भरलेल्या  ‘आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान परिषदे ‘ साठी त्यांची भारताचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली हती. पुढे अनेक देशात त्यांनी हिंदूंचे धर्मतत्वज्ञान प्रभावीपणे मांडले. नंतर ते जग प्रसिद्ध तत्वज्ञानी म्हणून मान्यता पावले.

ऑक्सर्फर्ड विद्यापीठाने त्यांना खास आमंत्रण देवून धर्म, नीतिशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयांवरील व्याख्यानांसाठी बोलविले होते. डॉ.राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचे कुलगुरू पद भूषविले. नंतर १९३१ ते १९३९ हि वर्षे त्यांनी राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले. १९४९ ते १९५२ मध्ये रशियातील राजदूत म्हणून त्यांची भारत सरकारने नियुक्ती केली होती. त्या देशातही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला. ते १९५२ मध्ये भारतात परतताच त्यांना प्रथम उपराष्ट्रपती पदावर १९५२ ते १९६२ पर्यंत कार्यरत होते. नंतर १३ मे १९६७ या कालावधीत ते भारताचे रास्त्र्प्ति म्हणून कार्यरत होते. १९५२ ते १९६७ हि वर्षे त्यांनी हि दोन पदे सांभाळली. नंतर ते निवृत्त झाले. भारताचे दुसरे राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. १९५४ साली भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब बहाल केला.

धर्म आणि तत्वज्ञान या विषयानप्रमाणेच त्यांचा या विषया वरही उत्तम अभ्यास झालेला होता.स्वतंत्र भारताला शिक्षण विषयक आपले धोरण निश्चित करणे आवश्यक होते. यासाठी १९४८ ला भारत सरकारने पहिला शिक्षण-आयोग स्थापन केला. त्या आय्गाच्या अध्यक्षपदी डॉ. राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली. त्यांनी लेखनही भरपूर केले होते. त्यांचे तत्वज्ञान विषयक ग्रंथ जगभर गाज्लेत. भारतीत धर्माचे श्रेष्ठत्व दाखवून देणारेहि त्यांचे ग्रंथ आहेत. प्राध्यापक असल्यापासून त्यांनी शिक्षकाच्या भूमिकेत कोणकोणते गुण असणे आवश्यक आहे ते स्व:त च्या उदाहरणाने दाखवून दिले. आदर्श शिक्षकाने व्यासंगी बनावे, चांगल्या पद्धतीने आपले विचार दुसर्याला सांगावे, शैक्षणिक क्षेत्रातील गुण-दोष पाहून त्यावर कशी मात करता येईल त्यावर लक्ष ठेवावे म्हणजेच आदर्श शिक्षक होता येईल हाच त्यांनी आदर्श शिक्षक बनण्यासाठी दिलेला संदेश होता.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आजन्म शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षण विषयांत लक्ष घालून दिलेले विचारधन लक्षात घेऊनच त्यांचा जन्मदिन हा’शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ.राधाकृष्णन यांनी खर्या गुरूची कल्पना अतिशय सर्वोत्कृष्ट शब्दात मांडली आहे. त्यांच्या मते खरा गुरु तोच जो विद्यार्थ्यांना केवळ बोद्धिक नव्हे तर अध्यात्मिक अंध:कारही नाहीसा करील. ज्याचा आचार आदर्शवत व अनुकरणीय आहे तोच आचार्य ! तो विद्यार्थ्याला सद्गुण व चांगुलपणा याची प्रेरणा देत असतो. शिक्षक हा केवळ माहिती देत नाही तर आत्म्याची शक्ती तो शिष्या मध्ये जागृत करतो त्यांनी शिक्षक आणि शिष्य यांच्यात काही नाते निर्माण झालेले नसेल तर शिक्षण हि एक यांत्रिक क्रिया बनते. शिक्षक आपल्या समोर कोणते चारित्र्य पूर्ण आदर्श ठेवतात याचे महत्व मुलांना असते. डॉ.राधाकृष्णन हे हाडांचे शिक्षक होते. आदर्श शिक्षकाची सर्व लक्षणे त्यांच्यात होती. शिक्षण क्षेत्रातील अनास्था दूर करण्यासाठी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यापासून आपण प्रेरणा घेऊ यां !डॉ. राधा कृष्णन यांचे १६ एप्रिल १९७५ रोजी निधन झाले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.... 

डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल. 1962 मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते. 

डॉ. राधाकृष्णन्‌ यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी मद्रासजवळील तिरुराणी येथे झाला. ते ब्राम्हन कुळातील असल्याने त्यांच्या घरात नेहमी धार्मिक विधी केला जात असे. त्या धार्मिक वातावरणातच ते लहानाचे मोठे झाले. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. 'तत्त्वज्ञान' हा त्यांचा आवडता विषय असल्याने त्यांनी या विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मद्रासच्या एका महाविद्यालयात नोकरी केली. नोकरी करत असतानाही त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी 'वेदांतातील नीतिशास्त्र' या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या प्रबंधास विद्यापीठाने सर्वोत्तम प्रबंध म्हणून जाहीर करून त्यांचा गौरव केला. एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वत:ची सार्‍या जगाला ओळख करून दिली. कुशल व्यक्तिमत्व व इंग्रजी भाषेवर असलेल्या त्यांच्या प्रभुत्वामुळे पार परदेशा‍त त्यांची प्रशंसा झाली. ऑक्सफर्ड विद्यापीठातही ते 'नीतिशास्त्र' या विषयाचे प्राध्यापक होते.

शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमुल्यन केला जात असल्याचे चित्र समाजात दिवस आहे. तसेच गुरू-शिष्य संबंधांमधील पवित्र भावना लोप पावत आहे. या संबंधामधील पावित्र्य कायम ठेवण्‍यासाठी व डॉ. राधाकृष्णन् यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. 

शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात.

शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. 

आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी‍ आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

धन्यवाद!!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर