● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

सुविचार

सुविचार


पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज)

दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.

त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी)

युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.

जगात काही अजरामर नाही तुमच्या चिंतासुध्दा!

जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.

लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.

आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.

सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.

माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.

दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुसयाला प्रजलीत करते.

आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.

सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !

उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.

जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.

संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.

ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.

शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.

कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!

मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.

अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.

चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.

काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.

कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.

उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.

कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.

पवित्र असावे पण पतित होऊ नये.

त्याग करावा पण ताठा नसावा.

स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.

आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.

स्वतंत्र असावे पण स्वैर नसावे.

घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.

माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.

सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर, परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा!

मानवी संबंध धावणाया आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात...ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.

श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.

ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆

सुविचार 1 :

अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.

सुविचार 2:

दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.

सुविचार 3:

आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.

सुविचार 4:

आपण काहीही करू शकतो पण, सर्वकाही नाही करू शकत.

सुविचार 5:

अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

सुविचार 6:

आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

सुविचार 7:

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

सुविचार 8:

आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.

सुविचार 9:

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

सुविचार 10:

गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे.

सुविचार 11:

इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.

सुविचार 12:

अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात.

सुविचार 13:

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे.

सुविचार 14:

शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

सुविचार 15:

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

सुविचार 17:

संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही.

सुविचार 18:

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

सुविचार 19:

“एवढे लहान बना कि प्रत्येक जण तुमच्यासोबत बसू शकेल … आणि इतके मोठे बना कि जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल”

सुविचार 20:

“नजर नेहमी अस्मानाकडे असावी पण पाय जमिनीवरच हवेत आपल्या क्षमताबरोबरच आपल्या मर्यादाचंही भान हवं. मर्यादांचा विचारही न करणं ही सकारात्मक वृती नव्हे, मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं, ही खरी सकारात्मक वृत्ती.”

सुविचार 21:

“विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली आहे असं समजा. प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्व:तची उंची वाढवा. आगीतून जायलाच हवं. त्याशिवाय कचरा जळून जात नाही.”

सुविचार 22:

अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.

सुविचार 23:

अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

सुविचार 24:

आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.

सुविचार 25:

काही माणसे पंचविसाव्या वर्षीच मारून जातात

पण त्याच दफन मात्र पंचाहत्तराव्या वर्षी केले जाते.

सुविचार 26:

कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे.
परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा.

सुविचार 27:

जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी रडावं लागतं.. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..

सुविचार 28:

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

सुविचार 29:

जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते…मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो.

सुविचार 30:

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
अंतःकरणात जिद्द आहे,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे.
◆●●●◆●◆●◆●◆●◆●◆

Suvichar 1:

काळ हे फार मोठे औषध आहे, मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्याने बर्‍या होतात…

Suvichar 2:

काही माणसे पंचविसाव्या वर्षीच मारून जातात पण त्याच दफन मात्र पंचाहत्तराव्या वर्षी केले जाते‌.

Suvichar 3:

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.‌

Suvichar 4:

कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा.‌

Suvichar 5:

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी हि त्याच्या साठी नवीन काहीतरी शिकण्याची संधी असते.

सुविचार 6:

गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !

सुविचार 7:

गुलाबाला काटे असतात म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असतो, याचे सुख माना.

सुविचार 8:

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

सुविचार 9:

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

सुविचार 10:

चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.

सुविचार 11:

जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी रडावं लागतं.. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..‌

सुविचार 12:

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

सुविचार 13:

जर तुम्ही कोणत्या ध्येयाशिवाय उठणार असाल तर तुम्ही पुन्हा झोपलेलाच बरे‌

सुविचार 14:

जितके अधिक जगण साजरं कराल तितके आयुष्य अधिक तुम्हाला साजर करण्यासाठी कारण देईल.‌

सुविचार 15:

दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, आत ज्योत ही हवीच.

सुविचार 16:

दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात.

सुविचार 17:

नेहमी तीच लोक आपल्याकडे बोट दाखवतात ज्यांची आपल्यापर्यंत पोहोचायची ऐपत नसते.

सुविचार 18:

परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.

सुविचार 19:

प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते.

सुविचार 20:


फक्त परिणामांकडे बघू नका, आपल्याला तेच मिळत ज्याचे आपण लायक आहोत.

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆

Suvichar 1:

फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो.

Suvichar 2:

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

Suvichar 3:

बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?

Suvichar 4:

मला आता नवीन टिकाकारांची गरज आहे कारण आधीचे टीकाकार माझ्या प्रेमात आहेत.

Suvichar 5:

मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.

Suvichar 6:

मी अशी फार थोडी महान माणसे पहिली आहेत ज्यांचा भूतकाळ संघर्षमय नव्हता.

Suvichar 7:

मी या जगात साधारण म्हणून जगायला आलेलो नाही.

Suvichar 8:

यश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे,
हे मी सांगू शकणार नाही.
पण स्वतःला ओळखून स्वतःला,स्वतःसाठी,स्वतःकङून नेमके काय हवे आहे,हे शोधणे म्हणजेच
यशाच्या जवळ जाणे होय.

Suvichar 9:

यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

Suvichar 10:

यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायर्‍या चढाव्या लागतात.

Suvichar 11:

रस्ता कितीही खड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बुट घालुन त्यावर आपण सहज चालु शकतो. परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणे कठीण होते. मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो.

Suvichar 12:

रिकामी पाकीट कधीच तुमच्या यशाच्या आड येत नाहीत जेवढे रिकामी डोके आणि रिकामी मन यशात अडसर बनते.

Suvichar 13:

विचार हेतूकडे नेतो,हेतू कृतीकडे,कृतीमुळे सवय लागते,सवयीमुळे स्वभाव बनतो व स्वभावामुळे साध्य प्राप्त होते.

Suvichar 14:

विचाराचे हत्यार नीट हाताळता यावे, याचेच नाव खरे शिक्षण.

Suvichar 15:

विचाराच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे.

Suvichar 16:

विजय हा मागून मिळत नसतो, तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो.

Suvichar 17:

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका..

Suvichar 18:

शिस्त म्हणजे तुमचे चांगले चिंतणारा मित्र आहे जरी त्याचे शब्द कितीही कठोर असले तरीही.

Suvichar 19:

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

Suvichar 20:

संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा.

Suvichar 21:

सावधपणा, उत्तम निर्णयशक्ती, स्वावलंबन, आणि दृष्ट निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात.

Suvichar 22:

सुख बाहेर आहे, आनंद आंत आहे.

Suvichar 23:

स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवायला शिका तरच इतर तुमच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवतील.

Suvichar 24:

होकार नाकारायला आणि नकार

स्वीकारायला सिंहाच काळीज लागत.

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆

वेळेचं महत्त्व सांगणारे सुविचार

घड्याळ सतत धावत आहे.

मिनिटांची काळजी घ्या, तास स्वतःची काळजी घेतील.

गेलेली वेळ पुन्हा येत नाही.

वेळ जाण्याआधी वेळेची किंमत ओळखा.

वेळ वाया, आयुष्य वाया.

कुठलंही काम करताना पूर्ण वेळ फक्त तेच काम करा.

जीवन फारच लहान आहे. जेवढा कमी अपव्यय करता येईल तेवढा कमी करा.

वेळ तशीही निघूनच जाणार आहे. प्रश्न आहे तुम्ही त्याचा कसा वापर करणार.

वेळेला सहज पणे कधीही घेऊ नका. जगातील सर्व पैसे देऊन गेलेला एक क्षण परत मिळवला जाऊ शकत नाही.


यशस्वी लोकांना वेळेच्या मूल्याची तीक्ष्ण जाण असते.

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर