● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Tuesday 17 April 2018

महात्मा बसवेश्वर

● महात्मा बसवेश्वर ●


(अन्य नावे: बसव,बसवण्णा, कन्नड: ಬಸವೇಶ್ವರ)
(जन्म : , इ.स. ११०५ - मृत्यू : इ.स. ११६७) 

हे कर्नाटकातील संत, समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला.


बसवेश्वरांनी इसवी सनाच्या बाराव्या शतकात अहिंसा, सत्य, भूतदया आणि सर्वधर्मसमानता, यासारखे क्रांतिकारक विचार मांडले. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य पद्धतीला आणि त्यातून जन्मलेल्या जाती पद्धतीला त्यांनी कायम विरोध केला. "कायकवे कैलास" म्हणजे कर्म करण्यातच स्वर्ग आहे हा विचार त्यांनी मांडला. कोणतेही काम कमी प्रतीचे किंवा उच्च प्रतीचे नसते, सर्व मानव समान आहेत. कोणतीही जात श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही असे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले.

कौटुंबिक पार्श्वभूमी:-

बसवण्णा शालिवाहन शके दहाव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ साली प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला. काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते. त्यांचे वडील मणिराज ऊर्फ भादरस हे बागेवाडी आगाराचे भांडारप्रमुख होते. त्यांच्या पत्नी मादुलांबा (मादंबा) परम शिवभक्त होत्या. बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज व बहिणीचे नाव नागम्मा होते.त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर ‘मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे’ असे म्हणून मुंज करून घ्यायचे नाकारले आणि घर सोडून ते कूडलसंगम (जि. विजापूर) येथे निघून गेले. कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे मोठे अध्ययन केंद्र होते. तेथे बसवेश्वरांनी बारा वर्षे वास्तव्य केले. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले. तेथे ते एकतीस वर्षे राहिले.

लोकशाही संसदेची स्थापना:-

बसवण्णांनी मंगळवेढा येथे "लोकशाही संसद म्हणजेच 'अनुभव मंटपाची' स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली.

लिंगायत धर्म सहिंता - वचन साहित्य:-

प्रत्येक धर्माला अधारभूत असे साहित्य असावयास हवे. त्या तत्वाच्या अनुयायींच्यग्मधे फूट पडून अस्तव्यस्त न होता संघटीत होऊन राहण्यास सर्वाना एकासूत्तात बांधणरे साहित्य असावे. खिष्रियन लोकांना बायबल, इस्लामीयांना कुरान असल्याप्रमाणे लिंगायत धर्मास वचन साहित्य हेच आधार साहित्य होय. बसवेश्वरांनी लिहिलेल्या षटस्यल वचनांत लिंगायत धर्माचे संपूर्ण सार सर्वस्व आहे.
बसवेश्वर आणि त्यांचे सहकारी शरणांची बचने आपल्याला अचार-विचाराबदृल मार्गदर्शन करणरे साहित्य म्हणून प्रत्येक लिंगायताने मानले पाहिजे. नंतर आलेले तोंटद सिध्दलिंगेश्वर षण्मुख स्वामी म्ग्गेय मायीदेव इत्यादींचे बचने बसवादि शरणाच्या वचनावर तात्विक सुत्रवार भाष्य, टीका लिहल्याप्रमाणे आहेत. त्यानंतर निजगुण शिवयोगी, मुप्पिन षडक्षरी, सर्पभूषण शिव्योगी बाल्लीला महंत योगी इ. प्रत्येक शिवयोगींचे साहित्य लिंगायत परंपरेत आहे. याशिवाय बसवादि प्रमथापासुन त्यानंतर होऊन गेलेल्या प्रत्येक शरणांच्या जीवनावर रचलेली पुराणे व काव्य साहित्य आहेत. या सर्व साहित्पाचा अभ्यास केल्यावर असे वाटू लागते की बसवादि शिवशरणांचे बचन साहित्य हे लिंगायत धर्माच्या पाठ्य पुस्तकाप्रमाणे आहे. श्री. सिध्दलिंगेश्वर षणमुख स्वामी,मग्गेय मायीदेव इ वचन साहित्याला प्रथम क्रमांकात प्रमाण ग्रंथ असे म्हणता येईल निजगुण श्विवयोगी, मुप्पीनार्थ, शिवायोगि शिवाचार्य इत्यादिंचे साहित्य व्दीतीय क्रमांकाचे प्रमाण ग्रंथ, हरीहर, राघवंक, चामरस इ.चे पुराण साहित्य तृतीय क्रमांकाचे प्रमाण ग्रंथ आहेत असे म्हणावे लागेल.

याप्रकारे शरणांच्या वचनांच्या आधारे आचरण आणि विचार करणारेच खरे लिंगायत आहेत असे शिवयोगी सिध्दरामेश्वरांनी आपल्या वचनात म्हटले आहे.

स्मृती समुद्रात जाऊ घा, श्रुती वैकुंठात राहू घा
पुराण अग्नीत जाऊ घा, आगम वायूत जाऊ घा
आमुच्या शरणांचे वचन कपिलसिध्दमल्लिकार्जुन
महालिंगाच्या हृदयात ग्रंथित होऊ घा
आमच्या एका वचनाच्या पारायणास
व्यत्साचे एक पुराण पारायण होई न सम
आमचे एकशे आठ वचनांच्या अध्ययनास
शत रूद्रादि असे न सम
आमुच्या एक हजार वचनांच्या पारायणास
गायत्रीचे एक लक्ष जप न होई समान.

सोलापूरचे सिध्दरामेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे लिंगायतांज्या आचार व बिचाराला शरणांचे वचनेच अधार शास्त्र होया लिंगायत धर्मानुयायांनी वचनांचे पारायण आणि अध्ययन करावयास हवे. असे अध्ययन केल्यास त्याचे फळ म्हणून स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. सत्यार्थ निर्णय घेताना शास्त्र प्रमाणापेक्षा स्वानुभव प्रमाणाच श्रेष्ठ मानून लिंगायतांनी विश्वास ठेवावा. या कारणे मुढ संप्रदत्यापेक्षा सत्य हेच श्रेष्ठ समजून स्वतंत्रपणे विचार करणाराच खरा लिंगायत होय.

लिंगायत शब्दाचा अर्थ:-

जगविस्तार, नभोविस्तार
विस्तारातीत असे तत्व विस्तार
पाताळातीत तव श्री चरण असे!
ब्रम्हांडातीत तव श्री मुकूट असे!
अगम्य-अगोचर-अप्रतिम हे इष्टलिंग,
इवलासा झाला देऊनि माझ्या हाता,
हे कुंडल संगमनथा! (बसव बचना)

संपूर्ण विश्रात आत बाहेर व्यापलेला परमात्मा हा विराट रूपी आहे. तो अंतर्यामी ही आहे तसेच अतीतही आहे असा असलेला परमात्मा अगदी छोटासा आकार घेऊन इष्टलिंग रूपाने भक्ताच्या करकमलांत म्हण्जे डाव्या हाताच्या तळ्व्यात येतो हे इष्टलिंग विश्वरूपी महालिंगाचे छोटे रूप, अकार होय. चेतन्यमय परवस्तुपासून सचराचर सृष्टी जेथे प्रकट झाली, जैथे लीला दाखवून, ज्यांत विसर्जन पावतो त्या सत्- चित्- आनंद रूपी परमात्मास लिंगायत प्रक्रीयेत्त 'लिंग' म्हणून संबोधिले जाते. अशा या परवस्तूस विश्राचा आकार असलेल्या गोलाकारात लहान रूप देऊन शरीरावर धारण करतो तोच लिंगायत होय. लिंगायतास लिंगवंतही म्हटले जाते. धन असलेला धनवंत, गुणी असलेला गुणवंत, विधा असलेला बिधावंत, श्री असलेला श्रीमंत याप्रमाणे लिंग असलेला लिंगावंत, जो अंगवर लिंग धारण करीत नाही तो लिंगायत नव्हे लिंगायतास वीरशैव, लिंगांगि, लिंगसंगी, जंगम, सिरिजंगम आशाही नावे आहेत.
या धर्मातील मुख्य महत्वाचा नियम म्ह्णजे इष्टलिंग धारण केल्याने एक व्यक्ती लिंगायत होते जन्मामुळे नव्हे. जन्मत: लिंगायत म्हणवून घेणारा पण इष्टलिंग धारणा न करणरा व्रतहीन आसून समाजापासून बाहेर असलेला होय असे शाणांनी स्पष्टपणे सांगितले आहे. कोणत्याही कारणमुळे लिंगाला काढून ठेवलेला आणि जन्मत: आपण लिंगायत आहोत म्हणून खोटे बोलणात्या बद्दल गुरूबसवेशांनी कठोरपणे टीका केलेली आहे.

लिंग नसता चालणार, लिंग नसता बोलणारा
लिंग नसता थुंकी गिळल्यास, केव्हाही किल्मिष्च
यास काय म्हणावे! काय म्हणावे बा!
लिंगाशिवाय चालणात्याचे अंग लौकीक स्पर्श करू नये
लिंगाशिवाय गमन केल्फ़्यास त्याचे चालणे बोलणे
व्रतहीन कूडल संगमदेव ( ब.ष.व. ६६८ )

इष्टलिंगासं आपल्या शरीरावर धारण करणे हा अति अवश्यक असा प्रथम नियम आहे. तसे धारण करणरा तोच लिंगायत होय.

लिंगायत धर्म संस्कार
लिंगायत धर्म: मुख्य तत्वे
लिंगायत धर्म चळवळ:-

लिंगायत स्वतंत्र धर्म आहे. तो अन्य कोणत्याही धर्माची जात, उपजात, शाखा अथवा पंथ नव्हे. बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन धर्माला ज्या वैशिष्ट्यामुळे स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळाली ती सर्व वैशिष्ट्य लिंगायत धर्म पूर्ण करतो. म्हणून तो एक स्वतंत्र धर्म आहे. स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळविण्यासाठी धर्मगुरु, धर्मसंहिता, धर्मचिन्ह,धर्माचे नाव,धर्मक्षेत्र, धार्मिक केंद्र, धर्मसंस्कार, धार्मिक विधी, धर्माचा ध्वज, धर्माचे ध्येय इ. लक्षणे असावी लागतात. ती लिंगायत धर्मात आहेत. म्हणून तो स्वतंत्र धर्म आहे.

धर्मगुरु:- विश्वगुरु महात्मा बसवण्णा.
धर्मसंहिता:- वचनसंहिता.
धर्मग्रंथ:- समानता पटवून देणारे वचन साहित्य.
धर्मभाषा:- लोकभाषा कन्नड.
धर्मचिन्ह:-सुष्टीकर्ता, समतेचे प्रतिक असणारे इष्टलिंग.
धर्माचे नाव:- लिंगायत
धर्मक्षेत्र:- बसवण्णांचे ऐक्य क्षेत्र कुडलसंगम, शरण भूमी बसवकल्याण, उळवी, बसवन-बागेवाडी.
धर्मसंस्कार:- इष्टलिंग दीक्षा.
धार्मिक व्रत:- शरण व्रत.
प्रार्थना केंद्र:- अनुभवमंटप.
धर्मतत्वे:- अष्टावरण, पंचाचार, षटस्थल.
धर्माचा ध्वज:- इष्टलिंग असणारे षटस्थल ध्वज.
धर्माचे ध्येय:- जात , वर्ग, वर्णरहित धर्मसहित कल्याण राज्य निर्माण करणे.
धार्मिक सण आणि उत्सव:- बसवादी शरणांचे स्मृती उत्सव
धर्मानुयायी:- शरण: कोटींच्या संख्येत आहेत.

चातुर्वर्ण्य व कर्मकांड विषयक विचार:-

वर्ण धर्माला वेडाचार ठरवतांना बसवण्णा म्हणतात,
चांभार उत्तम तो दुर्वास
कश्यप लोहार, कौंडिण्य तो न्हावी
तिन्ही लोकी बरवी प्रसिद्धी ती
जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार.

भस्म, गंध टिळा लावून काय उपयोग आहे, मणी गळ्यात बांधून काय उपयोग आहे जर तुमच्यात शुद्ध अंतरंग नसेल, मनाची शुद्धता नसेल हे सर्व देखावा आहे. लोक, ज्या गोष्टी आपल्या आचरणात येणे कठीण आहे त्याच गोष्टीच्या बाह्य अवडंबराने स्वतः शुद्ध मनाचे आहोत असा खोटा आव आणतात. जे देवाला दूध, लोणी, तूप अर्पण करतात ते अंधभक्त होत. त्या संदर्भात बसवण्णा म्हणतात,

दुग्ध ते उच्छिट तथा वासराचे।
पाणी ते मत्स्याचे उच्छिष्टची।
पुष्प ते उच्छिट तथा भ्रमराचे।
साधन पूजेचे काय सांगा ?

दूध हे वासराचे उष्ट असते, पाणी माशांचे उष्ट असते, पुष्प भ्रमराचे उष्ट असते असे वापरलेले अस्वच्छ उष्ट साधने देवाच्या पूजेचे साधन होऊ शकते का ? अशाप्रकारे बसवण्णांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीयता, बळी प्रथा, व्रतवैकल्य, उपास-तापास इत्यादींवर प्रखर हल्ला केला आहे. वीरशैव विचारधारा ही लिंगायतांना धार्मिक, मानसिक आणि सांस्कृतिक गुलाम करण्याचे षड्यंत्र आहे. आज लिंगायत विरुद्ध वीरशैव असा भेद निर्माण झाला आहे. वीरशैव हे सनातन धर्माचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. वर्णधर्म त्यांना मान्य आहे, ब्राह्मण व्रतवैकल्ये मान्य आहेत. वीरशैव विचारधारेचा प्रमुख ग्रंथ सिंद्धान्त ’शिखामणी’ हा वर्णाश्रम धर्मावर आधारित असल्याचे कारण हा ग्रंथ आगम, निगम, शैवपुराण, वेद शास्त्र इत्यादींच्या मूळ स्रोतांशी बांधलेला आहे. बसवण्णा एका वचनात म्हणतात : -
दगडाचा देव देव नव्हे।
मातीचा देव देव नव्हे।।
वृक्षदेव देव नव्हे।
सेतु बंध रामेश्वर।।
अन् इतर क्षेत्राचा।
देव देव नव्हे।।
देव तुमच्या अंतर्यामी।
हे कुडलसंगमदेवा।।

आज परिस्थिति अशी आहे की लिंगायत धर्माचा मूळ उद्देश आणि बसवण्णांची शिकवण काय आहे हे लोकांना माहीत नाही. लिंगायत हे पूर्णपणे ब्राह्मणी वर्चस्वाखाली आहेत. लिंगायत राशीभविष्य पाहतात तेही ब्राह्मणाकडून; लग्नाचे मुहूर्त ब्राह्मणाकडून काढून घेतात; त्यांचे लग्न व अन्य धार्मिक संस्कार ब्राह्मणच करतात. लिंगायत हे बसवण्णांच्या मूळ विचारधारणेपासून दुरावला गेला आहे. त्यांचे ब्राह्मणीकरण केले गेले. लिंगायत हे कर्मकांड, देव, व्रतवैकल्य, भविष्यवाणी, यज्ञ, अंधश्रद्धा, आत्मा अशा चाकोरीत गुंतलेले आहेत. त्यामुळे लोकांना वाटते की ते ब्राह्मण आहेत. असाच प्रचार व प्रसार करून ब्राह्मणवादी लोक यशस्वी झाले आणि लिंगायतांना ब्राह्मणी धर्माच्या अधीन बनवले. संत बसवण्णांनी आयुष्यभर भटशाहीतून मुक्त करण्यासाठी अनुभव मंटपाची स्थापना केली. त्यातून साहित्य निर्माण केले. वेद, पुराण, स्वर्ग, देव देवता, आत्मा, पुनर्जन्म, यज्ञ, वैकल्य ही थोतांडे नाकारली आणि ७७० परगड जातीतील लोकांना सोबत घेऊन लिंगायत धर्माची स्थापना केली.

बसवण्णा हे नाग लोकांचे दैवत आहे हे पटवून सांगताना अक्कामहादेवी आपल्या वचनात म्हणतात:-
देव लोकांचा देव बसवण्णा
मत्स लोकांचा देव बसवण्णा,
नाग लोकांचा देव बसवण्णा। मेदुगिरि मंदागिरीचा देव बसवण्णा।
चेन्नमल्लिकार्जुना माझा तुमचा। तव शरणांचा देव बसवण्णा


धन्यवाद.


                        ●●●●●●◆◆●●●●●●

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर